पोस्ट्स

आमदार किसन कथोरे कार अपघातात २ जणांच्या मृत्यू प्रकरणी वाहन चालकाची जामिनावर मुक्तता

इमेज
दहागाव जवळ भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या मालकीची असलेल्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आमदारांचा कार चालक असलेल्या आरोपीला अटक केली. मात्र सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता काही तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मुरबाड (प्रफुल्ल थोरात)  - कल्याण तालुक्यातील दहागाव जवळ भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या मालकीची असलेल्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वारसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आमदारांचा कार चालक असलेल्या आरोपीला अटक केली. मात्र सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता काही तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. किरण भोपी (वय. २९) असे कार चालकाचे नाव आहे. कार आणि मोटारसायकलमध्ये जोरदार धडक रविवारी संध्याकाळीच्या सुमारास दहागाव नजीक आमदार किसन कथोरे यांच्या कार आणि म...

मेव्हणी घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी पकडली

इमेज
मेव्हणी च्या घरात त्याच्या वयोवृद्ध सासू  व्यतिरिक्त घरात कुणी नसल्याची माहिती काढली. त्यानंतर मित्रासोबत थेट उल्हासनगरहून मध्य प्रदेशातील इंदौर गाठत चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या आधारे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. उल्हासनगर:-   मेव्हणी च्या  घरात त्याच्या वयोवृद्ध सासू व्यतिरिक्त घरात कुणी नसल्याची माहिती काढली. त्यानंतर मित्रासोबत थेट उल्हासनगरहून मध्य प्रदेशातील इंदौर गाठून घरातील वयोवृद्ध महिलेला मारहाण करीत रोकड व दागिन्यांची जबरी चोरीचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील चोरट्या नातेवाईकासह त्याच्या साथीदाराला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. मुकेश खूबचंदानी असे साडूच्या घरात डल्ला मारणाऱ्या नातेवाईकचे नाव आहे. तर आनंद कुशमंडल असे या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या चोरट्याचे नाव आहे. कर्जबारी झाल्याने मित्राच्या मदतीने साधला होता चोरीचा डाव इंदौरमध्ये अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत  मेव्हण्याची  ची वयोवृद्ध आई विमल दास ही मुलगा व सून कामाला गेल्यावर...

अंबरनाथच्या युवकाचे "अविरत दानयज्ञ"

इमेज
     YJ बॉस ग्रुप सामाजिक संस्था अंबरनाथचा  स्तुत्य  उपक्रम     अंबरनाथ:- (प्रफुल्ल थोरात)- अंबरनाथ शहरात कुणीही उपाशी राहू नये म्हणून अन्नदान करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था सातत्याने काम करतात. भारतीय संस्कृतीमध्ये, अन्नाचे वाटप हे नेहेमीच एक पवित्र कर्तव्य मानले गेले आहे.  भारतीय उपखंडातील प्रत्येक समाजात, अन्नदानाशिवाय, किंवा प्रसाद – पूजेच्या दरम्यान अर्पण केले जाणारे खाण्याचे पदार्थ, याचे वाटप  केल्याशिवाय कोणताही उत्सव किंवा कार्यक्रम पूर्ण होत नाही.       हाच संस्कृतीचा वारसा उराशी बाळगून अंबरनाथ मधील YJ बॉस ग्रुप सामाजिक संस्था मधील युवक अन्नदान करत आहेत. आपल्या पॉकेट मनी मधील थोडेसे पैसे बाजूला करत तर काही तरुण पार्ट टाइम जॉब करून दररोज 10 रुपये जमा करतात.आणि  दर महिन्याच्या 15 तारखेला अन्नदानाचा उपक्रम राबवतात.अंबरनाथच्या जयभीम सोसायटीला लागून असलेल्या मातोश्री कॉम्प्लेक्सच्या बाहेर अन्नदान करतात.त्या भागातील सर्वच घरातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर जेवण मिळेल तसे पाकीट बनवून घरोघरी जाऊन व मातोश्री क...

भाजयुमो कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी कुलदीप चोप्रा याची वर्णी

इमेज
  भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी, युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी घोषित केली. अंबरनाथ:- ( प्रफुल्ल थोरात ) -आपल्या जन्म दात्या आई कडून  संघाचे बाळकडू घेतलेल्या  सामान्य कुटूंबातील   कुलदीप चोप्रा यांची    भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी  निवड करण्यात आली. भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे व  भाजयुमो कल्याण जिल्हाअध्यक्ष मिहिर देसाई यांनी ही निवड केली . शनिवारी चोप्रा यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी  कुलदीप चोप्रा म्हणाले की, आज पर्यंत केलेल्या सामाजिक कामांची दखल पक्षाने घेतली. आपल्यावर पक्षाने मोठी  जबाबदारी सोपवली आहे. पक्ष हितासाठी काम करत युवकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे. कामाद्वारे केलेली निवड सार्थ ठरवणार असल्याचे प्रतिपादन चोप्रा यांनी केले. त्यांच्यातल्या असलेल्या कार्यकर्त्याला  भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी,पारखून भाजप सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करून जो विश्वास त्यांच्यावर दाखविला आहे,त्याबद्दल  कुलदीप चोप्रा यांनीअध्यक्ष मिहिर देसाईचे आभार मा...

अंबरनाथ वीज कंत्राटी कामगारांचे कामगार आझाद मैदानावर आंदोलन...

इमेज
  अंबरनाथ :-कोरोना सारख्या महामारी काळात स्वतःचा जीव धोक्यात घालत,ऊन, वादळ,वारा, पावसात आपल्या जीवाची तमा न बाळगता राज्यातील जनतेला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत करणाऱ्या कामगारांना न्याय मिळावा, भरती मध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशा नुसार वयोमर्यादेत वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती SSC च्या मार्क मेरिट नुसार न लावता ITI वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी. कोरोना काळात शहीद झालेल्या 26 कामगारांना आर्थिक मदत करावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून आज रोजी कार्यरत अनुभवी एकाही कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ना.ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मागील 5 – 6 महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची ...

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

इमेज
  बलात्काराच्या मुद्यावर नेमकं काय म्हणाल्या नायक? महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे. छत्तीसगढमधील बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना अध्यक्षा किरणमयी नायक म्हणाल्या,”जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांनी जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात,” असं नायक म्हणाल्या. “अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढल...

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग

इमेज
   अध्यक्षीय निवडणुकीत अटीतटीच्या राज्यांमधील निवडणूक निकालास आव्हान देणारी ट्रम्प यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ट्रम्प यांची निवडणुकीतील निकालावरची न्यायालयीन लढाई संपुष्टात आली आहे. निकालावर ट्रम्प यांनी म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाने आमचा अपेक्षाभंग केला, त्यांना काही विचार किंवा बुद्धी नाही, त्यांच्यात धैर्यही नाही. ही कायद्याची अवमानना आहे. टेक्सासचे अ‍ॅटर्नी जनरल केन पॅक्स्टन यांनी ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेत जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्वेनिया तसेच विस्कॉन्सिन या राज्यांतील निकालांना आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सॅम्युअल अ‍ॅलिटो व न्या. क्लॅरेन्स थॉमस यांनी सांगितले, की न्यायालय टेक्सासच्या याचिकेतील दावा मान्य करू शकत नाही. या याचिकेला रिपब्लिकन पक्षाच्या १२६ सदस्यांचा पाठिंबा होता. टेक्सासने दाखल केलेल्या आव्हान याचिकेत कुठलाही दखलपात्र मुद्दा नसून इतर राज्यांनी निवडणूक कशा पद्धतीने घेतली याबाबत त्यांचा दावा न्यायिक निकषांवर टिकणारा नाही. ...

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागणार!

इमेज
  ठाणे (प्रतिनिधी) : बुलेट ट्रेनला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध आजही कायम असला तरीही येथील शेतक-यांचा प्रश्न असल्याने आणि महापालिकेच्या तिजोरीत रक्कम यावी या उद्देशाने आता तिचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेनेही याबाबत मवाळ भूमिका घेण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला आहे. बुलेट ट्रेन ही ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे, त्यानुसार मौजे शीळ येथील ठाणे महापालिकेच्या नावे असलेला स. क्र. ६७/ब/५, भूखंडापैकी ३८४९.०० चौ.मी. क्षेत्राकरिता जिल्हाधिकारी ठाणे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणा-या खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेण्यासाठी महापालिका क्षेत्रतील गावापैकी शीळ येथील जमीन मोबदला दर ९ कोटी प्रति हेक्टर निश्चित केलेल्या दरानुसार भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क आबाधित ठेवून या भूखंडाचे अंतिम मूल्य ६ कोटी ९२ लाख ८२ हजार असे केले. हा भूखंड विकास आराखड्यातील रस्त्याचा भाग असून या भागातून हायस्प...

ठाण्यात ८५ लाखांच्या बनावट नोटा जप्त; तिघांना अटक

इमेज
  ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. ८५ लाख ४८ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटने ही कारवाई केली आहे सचिन आगरे, मन्सूर खान आणि चंद्रकांत माने अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी काही जण बनावट नोटा विक्रीसाठी कापुरबावडी सर्कलला येणार असल्याची माहिती खब-यांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. त्यांनी सचिन आगरे (वय २९) याला अटक केली. त्याच्याकडून ८५ लाख ४८ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगरे याच्या चौकशीतून आणखी दोन आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून मन्सूर खान आणि माने याला अटक केली. आगरे आणि खान हे दोघे रत्नागिरीतील चिपळूणचे आहेत, तर, माने हा मुंबईतील रहिवासी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कापूरबावडी पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेल...

इकडे का बसता असं बोलल्याच्या रागातून जाळल्या 5 टू व्हीलर , दोघांना अटक

इमेज
बिल्डिंगच्याबाहेर  बसता असं बोलल्याच्याव त्याची तक्रार घरी केल्याने, संतप्त झालेल्या दोन भावंडांसह अल्पवयीन मुलाने पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या 5 दुचाकींना आग लावली. ही घटना उल्हासनगरात घडली असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी या दोन भावांना अटक केली आहे. उल्हासनगर  -   बिल्डिंगच्या बाहेर बसण्यावरून हटकल्याने व त्याची तक्रार घरी केल्याने, संतप्त झालेल्या दोन भावंडांसह अल्पवयीन मुलाने पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या 5 दुचाकींना आग लावली. ही घटना उल्हासनगरात घडली असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी या दोन भावांना अटक केली आहे. रोहित नखवाल आणि पवन नखवाल अशी या आरोपींची नावे आहेत. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील 22 सेक्शन परिसरात प्रेम सागर बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या गेटसमोर तिघेजण रिक्षात बसून शनिवारी रात्री दारू पीत असल्याचा संशय एका रहिवाशाला आला. त्याने या मुलांना याबाबत जाब विचारला, मात्र ही मुले पुन्हा त्याच ठिकाणी आल्याने त्यांच्या पालकांकडे तक्रार करण्यात आली. याचा राग मनात धरून या मुलांनी पार्किंगमध्ये उभी असलेली...

मुरबाडचे आमदार किसन कथोरे कारला भीषण अपघात; दुचाकीवरील तरुण-तरुणी ठार

इमेज
  मुरबाड-   मुरबाड मतदार संघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या कारने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर असल्याचे समोर आले आहे. हि घटना मुरबाड तालुक्यातील दहागाव आपटी रस्त्यावर घडला असून घटनास्थळी कल्याण तालुका पोलीस दाखल झाले आहेत.    आमदाराची कारही क्षतिग्रस्त होऊन समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र कारमधील जखमी आणि मृत दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होऊन दुचाकीवरील महिला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात उडून पडली होती. त्यामुळे तीही गंभीर जखमी झाली आहे.    मोटरसायकलवरील तरुण-तरुणी जागीच ठार - याबाबत अधिक माहिती अशी की, मुरबाड मतदारसंघातील आमदार किसन कथोरे हे पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी 6 वाजून 45 वाजता अनखर पाडा, गोवेल...

ठाण्यात १० दुचाकी हस्तगत

इमेज
या चोरट्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. महादू आढारी (वय, ३२) धीरज शिंदे (वय २८, दोघेही (रा. गऊबाई पाडा, उल्हासनगर) असे अटक केलेल्या दुकलीचे नाव आहे. ठाणे -  दुचाकी लंपास करण्यात माहीर असलेल्या दुकलीवर झडप घालण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले आहे. या दुकलीकडून मध्यवर्ती पोलिसांनी १० विविध कंपनीच्या दुचाकी आतापर्यंत हस्तगत केल्या आहे. तर या चोरट्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. महादू आढारी (वय, ३२) धीरज शिंदे (वय २८, दोघेही (रा. गऊबाई पाडा, उल्हासनगर) असे अटक केलेल्या दुकलीचे नाव आहे. अनलॉक काळापासून बाइक चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून दरदिवशी शहरातील विविध पोलीस ठाण्यात ३ ते ५ दुचाकीचोरीच्या घटनांची नोंद होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उल्हासनगर पोलीस परिमंडळचे पोलीस उप-आयुक्त प्रषांत मोहिते यांनी विविध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, असे निर्देश दिले. त्यातच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी महिन्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास एपीआय खातीब करीत असतानाच चोरीला गेलेली हीच दुचाकी पु...

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र, १४ डिसेंबराला सर्व शेतकरी नेते बसणार उपोषणाला

इमेज
  १४ डिसेंबरला सर्व शेतकरी नेते उपोषणाला बसणार आहेत. सरकारसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, पहिले तीन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.  नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाला १६ दिवस उलटून गेले आहेत. केंद्र सरकार सोबतच्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. १४ डिसेंबरला सर्व शेतकरी नेते उपोषणाला बसणार आहेत. सरकारसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, आधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी ११ वाजता दिल्ली- जयपूर महामार्ग अडविण्यासाठी शहाजहापूर येथून शेतकरी 'दिल्ली मार्च' काढणार असल्याचे आंदोलक नेत्यांनी सांगितले. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही शांततेने आंदोलन करण्यास कटीबद्ध आहोत, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरमधून दिल्लीकडे कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही शांततेने आंदोलन करत राहू - प्रीत सिंह पन्नू संय...

एकच संविधान..

  स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही अनेक नियम कायदे बनविले गेले,  अंगिकारले गेले. स्वातंत्र्य  दृष्टीपंथात आले असता 1946 ला संविधान समिती सदस्य निवडले गेले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान रुपरेषा उद्दिष्ट ठरविणारा ठराव डिसेंबर 1946 ला मांडला व तो जानेवारी 1946 ला मंजूर झाला. या संविधान समितीत काँग्रेस पक्ष, मुस्लिम,  भारतीय ख्रिश्‍चन, पारशी, संघटना, विविध जाती जमाती, आदिवासी असे विविध प्रतिनिधी होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.  मसुदा समितीत इतर सात सदस्य होते बहुतांश वेळा हे सदस्य प्रकृती अस्वास्थ्य, दिल्लीपासून त्यांचे राहण्याचे ठिकाण दूर व इतर वैयक्तिक कारण यामुळ अनुपस्थित होते. तेव्हा मुख्य काम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या जागतिक विद्वानांने पूर्ण केले. संविधान मसुदा फेब्रुवारी 1947 ला तयार झाला. त्याचे संविधान समितीसमोर चर्चा, वाचन झाले. या तयार मसुद्याचे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत शेवटचे वाचन झाले. डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी संविधा...

अंबरनाथ पालिकेच्या सर्व जागा ५७ लढवणार -वंचीत बहुजन आघाडी

इमेज
  समविचारी पक्षाना सोबत घेऊन लढवणार... अंबरनाथ:-(प्रफुल्ल थोरात)   अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचीत बहुजन आघाडी चे अंबरनाथ निरीक्षण डॉ जाणू मानकर  यांच्या उपस्थितीत शनिवारी अंबरनाथ येथील तोरणा गेस्टहाऊस येथे आढावा बैठक पार पाडली. यामध्ये अंबरनाथ पालिकेतील  सर्व ५७ जागा समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.   जातीयवादी पक्षांसोबत न जाता समविचारी पक्षांना सोबत घेऊन अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक लढण्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेस युती होणार का या  चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळाले.  नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल कधी वाजू शकते त्यामुळे ह्या आढावा बैठकीकड सर्वांचे लक्ष लागून होते. शहरातील विकास करण्यासाठी आम्ही निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे वंचीत आघाडी चे युवा नेतृत्व प्रवीण गोसावी यांनी सांगितले. अंबरनाथ पालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून युती-आघाडीच्या चर्चा सुरू होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडी स्थापन करण्यात आ...

अंबरनाथ येथील प्रेमी युगलाची रेल्वे रुळावर आत्महत्या

इमेज
  अंबरनाथ (प्रफुल्ल थोरात)-अंबरनाथ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खुंटवली येथील दोन प्रेमियुगलाने रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना  संध्याकाळी 6 च्या दरम्यान घडली असुन संध्याकाळी ९ : ३० च्या सुमारास उघडीस आली आत्महत्या केल्याची घटना  पसरताच लोकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार खुंटवलीयेथील रहीवाशी प्रीती धादवड वय 23 वर्ष रा. खुंटवली अंबरनाथ , योगेश बेंडारे(पांड्या) वय 30 वर्ष रा. खुंटवली अंबरनाथ यांनी प्रेम प्रकरणातून अंबरनाथ-बदलापूर  जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जिवणयात्रा संपवल्याची घटना  घडली असुन घटनास्थळावर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा जोर धरत आहे .दोन्ही प्रमियुगल नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच प्रेम होतं मात्र घरच्या विरोधामुळे आत्महत्या केल्याच चर्चा खुंटवली भागात केली जातीय.मृत मुलांनी स्वतःला सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती.तर पुढील तपास अंबरनाथ लोहमार्ग पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.

शरद पवार पर्व..

इमेज
  शरद पवार यांना १२ डिसेंबर रोजी वयाची ७० वर्षे पूर्ण होत आहेत. येती काही वर्षे ते राजकारणात सक्रिय राहू शकतील. समाजकारणात तर त्यांना रस कायमच असतो. त्यानी वारंवार दाखवून दिले आहे. त्यांनी त्या दृष्टीने अनेक पुरोगामी पावले उचलली आहेत. मग ते महाराष्ट्राच्या प्रमुखपदी असोत किंवा राज्याच्या राजकारणात पाय रोवत असोत. पवार नेमके काय करणार आहेत हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. आता आयुष्याच्या आणि राजकारणाच्या या टप्प्यावर त्यांचा प्रवास काणत्या दिशेने होईल? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८च्या मध्यापासून. काँग्रेसमध्ये बंड घडवून आणत, जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. त्यांनी असे करताना, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले गेले. परंतु यात काही तथ्य नाही. कारण हा न्याय लावायचा झाला तर अनेक राजकीय नेते मनात असे दोन चार खंजीर घेऊन फिरत असतात असे म्हणावे लागेल आणि यापैकी अनेक संधी मिळताच खंजीराचा वापर करत असतात. पवारांच्या बंडाचा अर्थ लावायचा झाला तर तो, दिल्ल...